कर्जाची पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा लाभ •बँक खात्याशी आधार जोडणी आवश्यक

बँक खात्याशी आधार जोडणी आवश्यक

Farmer

पुणे : कर्जाच्या वेळेत आणि पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याची प्रक्रिया सहकार विभागाने सुरू केली असून १ ते ५ सप्टेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे त्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी  जोडणे  गरजेचे आहे.शेतकऱ्यांना ते जोडल्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभ देण्यास सुरुवात ही होणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. हा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

>

शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशांना जास्तीत जास्त रुपये ५० हजारांपर्यंत. प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी २०१८ १९ किंवा २०१९-२० या वर्षांत घेतलेले कर्ज ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना कर्जाच्या

मुद्दलाइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी हा लाभ घेण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसलेल्या अशा पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ ‘आपले सरकार सेवा’ केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे व ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावे. तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नसल्यास त्यांनीही बँकेशी संपर्क साधून आधार जोडावे, असे आवाहन ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिलिंद सोबले यांनी केले आहे.

शासकीय लेखा परीक्षकांकडून कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांकडून आणि कर्ज देणाऱ्या बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम  केले जात आहे. दिनांक १ ते ५ सप्टेंबर दरम्यान ही तपासलेली माहिती या योजनेच्या पोर्टलवर टाकली जाणार आहे. लेखापरीक्षकांची संख्या शेतकऱ्यांच्या संख्येनुसार  वाढविण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी  कोणत्याही दोन वर्षांत कर्ज पूर्ण  परतफेड केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.

– मिलिंद सोबले, जिल्हा उपनिबंधक, पुणे ग्रामीण

Top Posts

नाशिक कुंभमेळ्याची विकासकामे अन् अतिवृष्टीग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करा: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

अधिक वाचा

भटक्या व विमुक्त समाजासाठी राज्यभरात ९३७ विशेष वस्ती शिबिरे; दाखले मिळणे आता अधिक सोपे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अधिक वाचा

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या महसूल वाढीसाठी नवा प्लॅन! वॉटर मेट्रो, दिघी क्लस्टरसह पर्यटन प्रकल्पांना मिळणार गती – मंत्री नितेश राणे

अधिक वाचा

विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६: पुण्यात रंगणार राष्ट्रीय युवा महोत्सव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

अधिक वाचा

स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठे बदल! महाराष्ट्रात उच्चस्तरीय समितीची स्थापना; २५ हजार सुरक्षित क्लासरूम्स उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अधिक वाचा